Stamp Duty exemption Maharashtra सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी आता मुद्रांक शुल्क माफ
मुंबई : सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शुक्रवारी (दि.4) केली.
आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विद्यार्थी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
साध्या कागदावरही अर्ज करता येणार
पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही
दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल लागतो, तेव्हा सर्व विद्यार्थी व पालकांची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी धांदल सुरू होते. केवळ शैक्षणिकच नाही, तर इतर अनेक कारणांसाठीही दाखले लागतात.
Malegaon Plot Scam |भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मालेगावचे तत्कालिन प्रांताधिकारी निलंबित
निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होणार
Stamp duty exemption : सर्व दाखल्यांसाठी मुद्रांक शुल्क माफचंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्रीआता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून विद्यार्थी आणि पालकांना प्रमाणपत्रे मिळवणे सहज शक्य होणार आहेत. त्यामुळे दरवेळी पालकांचा होणारा खर्च वाचणार आहे.
विद्यार्थी, पालकांकडून स्वागत
महसूलमंत्री बावनकुळे यांनी, प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर प्रामुख्याने विद्यार्थी आणि पालकांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे. यामुळे आता साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले मिळवता येतील, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
नवीन घरकुल मंजूर यादीत नाव पाहा आता मोबाईलवर