चालक सुदेश हे प्रसंग पाहून घाबरतो पण रोहिणीचे बालपण गावीच गेले असल्याने तिला या गोष्टी ठाऊक होत्या, तिने सुदेशला धीर देत गाडीवर नियंत्रण ठेवत त्या कुटुंबाकडे न पाहता पुढे जात राहायला सांगितले. यावेळीही मागच्या वेळेप्रमाणे त्या कुटुंबाला मागे सारत गाडी सुसाट पुढे जाते. पण पुन्हा अचानक तोच प्रसंग घडतो. मिनिटांभरात तोच कुटुंब आणि तीच माणसं रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला यांच्या गाडीला हात दाखवताना दिसून येतात. यावेळीही गाडी काही थांवली जात नाही. असाच प्रसंग आणखीन दोनवेळा अगदी घाट उतरेपर्यंत सारखासारखा घडत असतो. एकदाका आंबेटचा घाट उतरला की त्यांच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी थांबतात.
या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली पण येथून जाताना रोहिणी आणि त्यांचे कुटुंब अजूनही त्या विचारात असतात की त्यांना ते कुटुंब पुन्हा दिसले तर… मुळात, या घटनेतून एक शिकण्यासारखे आहे की नियंत्रण असणे किती महत्वाचे आहे. आपल्यामध्ये नियंत्रण असेल तर नक्कीच सगळ्या अडचणी अगदी सोप्या होऊन जातात.
(टीप: ही बातमी सत्य घटनेवर आधारित असून यातील पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)