Rain Alert : गालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय. आज म्हणजेच शनिवारपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.

 

विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

Rain Alert : महाराष्ट्रासह 31 राज्यांमध्ये पुढील 6 दिवस मुसळधार पाऊस; कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? वाचा..

 

याशिवाय मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आलाय. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.

 

साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

 

सोयाबीन कापुस उत्पादक शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत जाहीर यादी पहा

 

त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.

 

अधिक माहिती येथे वाचा..

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!