Latest Marathi News राज्यातील नागरिकांसाठी राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नावाने ओळखली जात होती. या योजनेची मर्यादा पूर्वी 1.5 लाख इतकी होती. राज्याच्या योजनेप्रमाणेच केंद्र सरकारनेही आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली आहे. ही योजनाही राज्यात 23 सप्टेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष 5 लाख प्रती कुटुंब इतके आरोग्य संरक्षण देण्यात येते. Latest Marathi News

रुग्णालयात दाखल झालात तर चिंता नका करू, राज्य सरकारकडून मिळते तब्बल इतक्या लाखांची मदत

राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ करून प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना प्रती कुटुंब 10 लाख इतका आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊ.

CM EKNATH SHINDE | राज्यातील नागरिकांसाठी राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नावाने ओळखली जात होती. या योजनेची मर्यादा पूर्वी 1.5 लाख इतकी होती. राज्याच्या योजनेप्रमाणेच केंद्र सरकारनेही आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली आहे. ही योजनाही राज्यात 23 सप्टेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष 5 लाख प्रती कुटुंब इतके आरोग्य संरक्षण देण्यात येते.

सरकारनेही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ करून प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना प्रती कुटुंब 10 लाख इतका आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊ.

 

हेहि वाचा: राज्यातील या तालुक्यांना नुकसाभरपाई वाटप सुरू यादी पहा

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये याआधी ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश होता. तर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून 1209 आजारांवर उपचार करण्यात येत होते. मात्र, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यात बदल केला. यानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत नव्या 328 उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. तर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये नवीन 147 आजार वाढविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही योजना मिळून आता एकूण 1356 इतक्या आजारांवर ही योजना लागू झालीय.

जन आरोग्य विमा सेवेचे लाभार्थी कोण?
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेले पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येतो. ही आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र कर्नाटक सीमा लगत असलेल्या सीमाभागातील नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत.

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!