हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने पुन्हा एकदा पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे.
पावसामुळे देशातील अनेक भागात काढणीसाठी आलेल्या पिकांवर संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे याची भरपाई केली जाऊ शकते. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत पिकाच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.